भारताच्या एकाच आघातात चीनने पाकला दिलेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्व्स्त; आता लक्ष्य लाहोर…?


India Pakistan War News: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने खोडसाळपणा करत भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने हा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारताने थेट पाकिस्तानची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणाच नष्ट केली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गंत कारवाई करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळावर मिसाइल हल्ला करत 90 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतातील 4 राज्यांतील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकचा हा नापाक मनसुबा आपल्या भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. इतकंच नव्हे तर पाकची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्व्स्त केली आहे. विशेष म्हणजे, ही एअर डिफेन्स सिस्टिम चीनने दिली होती. 

भारताने नष्ट केलेली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम ही चीनने दिली होती. या यंत्रणेमुळं पाकिस्तान भारताच्या लढाऊ विमानांचा माग काढून त्यांची रडार यंत्रणा बंद पाडू शकत होता. तसंच, या यंत्रणेचा वापर करून हवेतील विमानांना क्षेपणास्त्रांनी टार्गेट करता येत होते. त्यामुळं भारतीय विमानांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करता येते. त्यामुळं भारतीय विमानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरण्याचा मोठा धोका होता. मात्र आता भारताने पाकिस्तानची ही रडार यंत्रणाच उद्ध्व्स्त केली आहे. 

HQ-9 रडार यंत्रणा नष्ट केल्यामुळं आता भारतीय लढाऊ विमानांना भारतीय हद्दीत घुसता येणार आहे. भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवर त्यांचा माग काढण शक्य होणार नाही. सुखोई, राफेलसारख्या विमानांना आता धोका कमी असेल. HQ-9 एअर डिफेन्स उद्ध्व्स्त झाल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. 

HQ-9 रडार यंत्रणा ही चीनच्या तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते. 2021 मध्ये ही यंत्रणा पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यात सामील झाली होती. या यंत्रणेची रेंज 125 ते 200 किमी असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच एकाचवेळी 100 लक्ष्यांचा मागोवा ही यंत्रणा घेऊ शकते. मात्र, चीनने दिलेली पाकिस्तानची HQ-9 ही यंत्रणा भारताच्या  S-400 समोर टिकू शकली नाही. 



  • Related Posts

    India Pakistan War Pakistan attacked 26 cities of India Sofia Qureshi’s big revelation about the attack

    India Pakistan War : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईव आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या…

    Operation Sindoor india pakistan war Centre granted the Chief of Army Staff powers to call out all officers and enrolled personnel of the Territorial Army know latest updates

    India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या धर्तीवर सध्या केंद्र शासनाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडत आहेत. गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सैन्याच्या तिन्ही तुकड्यांचे…

    Leave a Reply